बाजारपेठेत भाज्यांचे दर स्थिर


25th September 2017, 05:31 am
प्रतिनिधी
गोवन वार्ता
पणजी : पणजी बाजारपेठेत गणेशोत्सव काळात वाढलेले भाज्यांचे दर काही प्रमाणात कमी झाले आहे. मात्र, कांदा वगळता इतर सर्व भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. टोमॅटो व कांदा ४० रुपये प्रतिकिलो असून लसूण व अाल्याच्या दरातही वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात कांदा २५ ते ३० रुपयांनी किलो विकला जात होता. या आठवड्यात कांदा दरात वाढ झाली असून, ४० रुपये प्रतिकिलो दराने तो विकला जात आहे. तसेच कोथिंबिरीचे दर काही प्रमाणात वाढले आहेत.