भाजप कार्यकर्त्यांनी संयम राखला

मोठ्या विजयाची पर्रीकरांना अपेक्षा, काँग्रेसकडून मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा दावा


23rd August 2017, 08:48 pm
पणजी पोटनिवडणुकीदरम्यान काँग्रेस नेत्यांनी विविध प्रकारे गैरप्रचार करण्याचा तसेच घातपाताचा प्रयत्न केला. परंतु, भाजप कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आदेश देण्यात आल्याने अनुचित प्रकार घडले नाही. मात्र, काँग्रेसच्या या कृतीची स्वेच्छा दखल निवडणूक आयोगाने घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. दरम्यान, पणजीवासीयांनी दाखवलेला उत्स्फूर्त पाहता आपण बहुमताने निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला
पणजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसचे पणजीबाहेरील काही नेते व कार्यकर्ते पणजीत दाखल होऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत होते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.