शिवसेना प्रवक्ता राखी प्रभुदेसाई नाईक यांचा आरोप
कर्नाटक निवडणुकीत मतांच्या राजकारणासाठी म्हादई नदीचे पाणी कर्नाटकाला देऊ करणारे भाजपाध्यक्ष अमित शहायांनी रविवारी गोव्यातील आपल्या भाषणात म्हादई संदर्भात एकही शब्द उच्चारली नाही, हे आश्चर्यकारकआहे. म्हादईचे पाणी वळवण्यास भाजपने परवानगी दिली तर गोव्यातील लोक रस्त्यावरउतरतील आणि भाजप आघाडीचे सरकार खाली खेचतील याची कल्पना भाजपला आहे. शहा यांच्याम्हादईवरील मौनाने त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना आहे हे दाखवून दिले आहे,अशी टीका शिवसेना प्रवक्ता राखी प्रभुदेसाई नाईक यांनीपत्रकाद्वारे दिली आहे.
या गंभीर विषयावर शहा यांनी आपल्यापक्षाची भूमिका जाहीर करायला हवी. राज्यात खाणी बंद झाल्यामुळे आर्थिक संकट ओढवलेआहे. लाखो लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला असताना शहा यांनी याविषयावर जुजबी वक्तव्य करत न्यायालयामार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल,एवढे बोलून गोमंतकीयांचा अपमान केला आहे, असेही पत्रकात नमूदकरण्यात आले आहे.