मोरजीत कार्निव्हल : बाबू आजगावकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी | गोवन वार्ता
पेडणे : गोव्याचा प्रमुख व्यवसाय होत असलेल्या पर्यटन व्यवसायाच्या वृद्धीसाठी कार्निव्हल, शिमगा यासारखे कार्यक्रम आयोजित होणे गरजेचे आहे. यातून पर्यटकांबरोबर स्थानिकांचा आनंद द्विगुणीत होतो. यावर्षीच्या कार्निव्हलातून धार्मिक एकतेचा संदेश देतानाच पर्यावरणाद्वारे गोव्याचे गोयकारपण टिकवून ठेवूया, असे आवाहन पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी केले.
मोरजी येथे पर्यटन खात्याने आयोजित केलेल्या कार्निव्हल मिरवणुकीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.